अमरावती जिल्हा परिषदेविषयी

ग्रामीण विकासाच्या कामाला गती आणण्याचे काम प्रामुख्याने जिल्हा परिषद कडे सोपविण्यात आले असून विविध प्रकारच्या विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीमुळे ग्रामीण क्षेत्राचा चेहरा झपाट्याने उजळत आहे जिल्हा नियोजनामुळे आता स्थानिक आवश्यकतेनुसार कार्यक्रमाची मांडणी व अंमलबजावणी होत आहे दिनांक १मे १९६२ पासून म्हणजे जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून शासनाने जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केलेल्या व अभिकरण पद्धतीवर राबविण्याकरिता दिलेल्या शासकीय योजना व कामे स्थानिक क्षेत्रातील योजना राबवून जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष लक्ष दिले आहे कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग जलसंधारण मागासवर्गीयांचे कल्याण आरोग्य पिण्याचे पाणी ग्रामीण रस्ते प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा स्वच्छ भारत मिशन प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियान या एकात्मिक बाल विकास प्रकल्प इत्यादी योजना व कामे राबविण्यात जिल्हा परिषद कार्यशील आहे

दिनांक 1 मे 1981 ला झालेल्या अधिसूचनेनुसार या जिल्ह्यात 13 तालुके व तेरा पंचायत समिती होत्या तसेच दिनांक 1 मे 1999 पासून नवीन धामणगाव रेल्वे तालुका तिवसा व चांदुर रेल्वे तालुक्यातील काही गावांत विभाजन करून निर्माण करण्यात आला त्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्या 14 पंचायत समित्या व 14 तालुके अस्तित्वात आहेत


जिल्हा परिषदेचे मुलभूत कार्य :

  • ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा आणि सुविधा पुरविणे.
  • ग्रामीण भागात शाळा व ग्रंथालये स्थापन करून ती व्यवस्थितपणे चालविणे.
  • ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये सुरू करणे. तसेच वेळोवेळी साथींचे रोग निवारणासाठी प्रतिबंधक लसींचा कार्यक्रम राबविणे.
  • ग्रामीण भागात अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी विकास योजनांची अंमलबजावणी करणे. आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा चालविणे तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह स्थापन करणे.
  • ग्रामीण रोजगार राबविणेसाठी लघुउद्योग सुरु करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे.
  • ग्रामीण भागात पूल, रस्ते बांधणे व त्यांची देखभाल करणे तसेच इतर सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे.
  • रोजगारनिर्मिती करणे.

जिल्हा परिषदेचे मुलभूत कार्य :

जिल्हा परिषद, अमरावती ची स्थापना सन १९६२ ला झाली आणि जिल्हा परिषदेचे प्रत्यक्ष कामकाज ०१ मे १९६२ पासून सुरु झाले.



जि.प. अमरावती अंतर्गत विविध विषय समित्या

स्थायी समिती जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती
वित्त समिती बांधकाम समिती
कृषी समिती पशुसंवर्धन समिती
शिक्षण समिती आरोग्य समिती
महिला व बालकल्याण समिती समाज कल्याण समिती