अमरावती जिल्ह्या विषयी

अमरावतीचे प्राचीन नाव ‘उदुंबरावती ’ याचे प्राकृत नाव ‘उमरावती’ आणी अमरावती हे नाव अनेक शतकापासुन आहे. अमरावतीला प्राचीन अंबादेवी मंदीर आहे त्यापमुळे अमरावती नाव आहे असा समज आहे. अमरावतीला प्राचीन शिलालेख आहेत ते ही १०९७ मध्येर भगवान आदीनाथ आणी भगवान रिशबनाथ यांचे संगमरवरी दगडाचे पुतळे उभारले आहेत.१३ व्या शतकामध्येय गोविदंप्रभुनी अमरावतीला भेट दिली. याच काळात वरहद हा देवगिरीचा हींदुराजा (यादव)च्याय नियमानुसार राहत होता. १४ व्याि शतकामध्येा अमरावतीचे काही लोक अमरावती सोडुन गुजरात आणी माळवा या भागात स्थायईक झाले. अमरावतीचे स्था निक लोक काही काळा नंतर परत अमरावतीला आले. १६ व्या शतकामध्ये. औरंगपुरा ( आत्तााचा साबणपुरा) कडुन जुम्माी मशिद बादशहा औरंगजेबास भेट म्हणुन दिले. १७२२ मध्ये छत्रपती शाहु महाराज अमरावती आणी बडनेरा येथे राणोजी भोसले यांना भेटले. जेव्हाा अमरावती भोसले की अमरावतीला म्हरणुन ओळखत होते.अमरावतीची पुर्नबांधणी आणी भरभराठी राणोजी भोसले यांनी देवगाव आणी अजंनगाव सुर्जी चा तह आणी गावीलगडचा विजय (चिखलद-याचा किल्लाा) झाला तेव्हाद केली. ब्रिटीश जनरल ऑथर वेलस्ली चा अमरावती येथे कॅम्पज अमरावती .

भौगालीकदृष्ट या अमरावती ही समुद्रसपाटी पासुन ३४० मी. वेढलेली आहे. शहराच्या पुर्व भागाकडे पोहरा व चिरोडीच्याग टेकडया आहेत. माल टेकडी ही शहराच्या मध्य भागी आहे. मालटेकडीची उंची ६० किमी आहे. हा पुतळा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा मोठया उंचावर आहे. पुर्वेकडे दोन मोठे तलाव आहेत, एक म्हणजे छत्री तलाव आणी दुसरे म्हवणजे वडाळी तलाव.

महाराष्ट्राोच्याआ पुर्वेकडील भागात अमरावती आहे . मुबंई – कलकत्तां हायवे मार्ग आहे. पश्चिम विदर्भाचे हे मुख्य विभाग आहे.
महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा. २०० ३२’ ते ११० ४६’ उ. आणि ७६० ३८’ते ७८० २७’ पू. क्षेत्रफळ १२,६२६ चौ.किमी.; लोकसंख्या २८,८७,८२६. याच्या पश्चिमेस अकोला व बुलढाणा;उत्तरेस मध्य प्रदेशातील निमाड, बेतूल व छिंदवाडा; पूर्वेस वर्धा व नागपूर आणि दक्षिणेस यवतमाळ व वाशीम हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यात उत्तरेस मेळघाट, अचलपूर, मोर्शी आणि दक्षिणेस दर्यापूर, अमरावती व चांदूर असे सहा तालुके आहेत. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १९३ किमी. व दक्षिणोत्तर रुंदी १४५ किमी.आहे. महाराष्ट्राच्या ३.९७ टक्के क्षेत्रफळ व ३.०५ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.